31 जुलैनंतर या 5 राशींच्या व्यक्तींना येणार सोन्याचे दिवस; धन-दौलत, मानसन्मान वाढणार

टाइम्स मराठी । देवगुरु ग्रह बृहस्पती (Guru) हा सुख, सौभाग्य, ज्ञान आणि विवाहाचा कारक आहे. सध्या गुरु ग्रह वृषभ राशीत (Taurus Horoscope) विराजमान आहे. आणि 31 जुलै 2024 रोजी बृहस्पती नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश करणार आहे. यानंतर ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. समाजात या व्यक्तींचा मानसन्मान वाढेल तसेच धन-दौलतमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मेष वृषभ, मकर, कन्या आणि वृश्चिक अशा या ५ राशी आहेत. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

   

मेष –

देवगुरु बृहस्पतीचं रोहिणी नक्षत्रात चरण परिवर्तन झाल्यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा होईल. प्रत्येक कामात या राशीच्या लोकांना यश मिळेल. तुमची धनदौलत वाढेल, उत्पन्नाचे नवनवीन सोर्स तयार होतील. तुम्ही ज्याठिकाणी नोकरी करत असाल त्याठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक केलं जाईल. कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात मात्र तुमची आर्थिक स्थितीही वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ

बृहस्पति नक्षत्राच्या बदलात, वृषभ राशीच्या लोकांच्या चढत्या घरात गुरूचे संक्रमण होईल. त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला नातेसंबंधात फायदा होईल आणि जीवनसाथीचा तुमचा शोध पूर्ण होऊ शकेल. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना धनलाभ होईल. ज्या लोकांना आरोग्याची चिंता होती ती दूर होईल. कौटुंबिक संबंध चांगले राहतील तसेच नवे मित्र मिळतील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरूचा नक्षत्र बदल 9व्या घरात होईल. या संक्रमणाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. जनमानसात तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याठिकाणी सुद्धा या राशीच्या व्यक्तींना चांगलं यश मिळेल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. एवढच नव्हे तर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तेथेही फायदा होऊ शकेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांच्या सातव्या घरात गुरुचे संक्रमण होईल. या संक्रमणामुळे या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरी लागू शकते. व्यवसायाची सुरुवात केली तर त्यामध्येही यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. जे तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच परत मिळतील.

मकर

मकर राशीच्या लोकांना गुरु ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे आणि संक्रमणाच्या वेळी गुरु तुमच्या पाचव्या भावात प्रवेश करेल. यामुळे मकर राशीच्या व्यक्तीना हा काळ अनुकूल राहील. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तयार होतील. नवे मित्र मिळतील. जोडीदारासोबत असलेला तणाव संपुष्ठात येईल आणि नव्याने आयुष्य सुरु होईल.