Chanakya Niti : ‘या’ चुका केल्यास लक्ष्मीमाता कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीचे (Chanakya Niti) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पालन करत असतात. आचार्य चाणक्य यांनी या नीती मध्ये यशस्वी होण्याचे मार्ग, जीवन साध्या पद्धतीने जगण्याचे मार्ग यासारखे अनेक मार्ग सांगितले आहेत. ज्याचा फायदा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये होतो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती प्रमाणे नीतिशास्त्र, यासारख्या बऱ्याच संग्रहाचे लेखन केले आहे.

   

आचार्य चाणक्य म्हणतात तुमचं भविष्य उज्वल बनवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आणि ते विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी वाईट लोकांपासून दूर राहणे देखील गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. चाणक्य नीति मध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये चुकूनही करू नये, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. त्यामुळे व्यक्तींच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात.

१) किचन मध्ये उष्टे भांडे ठेवू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, घरासोबतच किचनची साफसफाई करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर महिला उष्टे भांडे तसेच पडू देतात. किचनमध्ये कधीच उष्टे भांडे ठेवू नका. बऱ्याचदा आपण रात्रीचे जेवणाचे भांडे घासण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे ते भांडे तसेच पडून राहतात. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. आणि घरामध्ये दारिद्र वाढते.

२) कोणाचाही अपमान करू नये

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याची वागणूक आणि व्यवहारावरून त्याचा स्वभाव समजत असतो. त्याचबरोबर जो मनुष्य वृद्ध, विद्वान, गरीब, आणि महिलांचा अपमान करतो, त्यांच्या घरात कधीच माता लक्ष्मी येत नाही. बरेच व्यक्ती स्वतःला मोठे समजून दुसऱ्यांचा अपमान करत असतात. त्याचबरोबर गरिबाला असे व्यक्ती कधीच मदत करत नाही. जर दुसऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला तर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीसोबत आदराने वागा.

३) अपशब्द बोलणे टाळा– Chanakya Niti

जीवनात बरेच असे लोक आहे, जे दुसर्यांना अपशब्द बोलत असतात. परंतु हे अत्यंत चुकीचे असून जे व्यक्ती दुसऱ्यांना अपशब्द वापरतात त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. त्याचबरोबर दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक किंवा अपशब्द बोलणारे लोक श्रीमंत जरी असतील तरी ते काही काळानंतर गरिबीकडे वळतात. कारण माता लक्ष्मी या लोकांवर प्रसन्न होत नाही.

४) सायंकाळी आंबट पदार्थ करू नका दान

आचार्य चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti) सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कोणालाच दही, लोणचे, ताक यासारखे आंबट पदार्थ दान करणे चुकीचे आहे. त्याचबरोबर मीठ दान करणे देखील टाळले पाहिजे. यामुळे घरात आलेली माता लक्ष्मी परत जाते. म्हणून कधीच रात्रीच्या वेळी किंवा सायंकाळी आंबट पदार्थ दान करू नका.