Chanakya Niti : मित्रांना कधीही सांगू नका ‘या’ गोष्टी; चाणक्यांनी असं का म्हंटल?

Chanakya Niti । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य  यांनी जीवनात बऱ्याच  वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य  चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. आचार्य चाणक्य यांच्यामते, जीवन जगत असताना व्यक्तिला बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आणि लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून ते काही संकटांवर मात करू शकतील. जीवनात अनेक समस्या टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवणे गरजेचे आहे.  बऱ्याच व्यक्तींच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. म्हणजेच त्या व्यक्ती त्यांच्या पोटात कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाहीत. परंतु हे अत्यंत चुकीचे असून यामुळे प्रचंड प्रॉब्लेम होऊ शकतात.  तुमच्या गुप्त गोष्टी कोणाला सांगितल्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे काही गोष्टी नेहमी तुम्ही स्वतः च्या मनात ठेवल्या पाहिजे.

   

 1) कमतरता शेअर करू नका

बऱ्याच लोकांना आपल्या कुटुंबांमधील सर्व गोष्टी मित्र नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांसोबत शेअर करायला आवडतात.  परंतु त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर दुरावा आणि अविश्वासाची भावना निर्माण होते. त्याचबरोबर घरातील गोष्टी घरातच राहिल्या तर तुमचे जीवन आनंदी होऊ शकते.  आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या काही समस्या किंवा कमतरता असतील त्या कोणासमोरच सांगू नका. कारण यामुळे कुटुंबाची मानहानी होते. यामुळे तुमचे नाती देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे कुटुंब मधील कोणत्याच गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना किंवा मित्रांना, नातेवाईकांना सांगू नका. त्याचबरोबर स्वतःची कमजोरी देखील इतरांना सांगणे अयोग्य आहे.

2) स्वतःचे दुःख स्वतः जवळ ठेवा– Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणालाही तुम्हाला झालेले दुःख सांगत बसू नये.  यामुळे लोकांमध्ये तुम्ही मजाक चा विषय बनवू शकतात. प्रत्येक व्यक्तीला सहानुभूतीची गरज असते.  परंतु या सहानुभूतीसाठी व्यक्ती मित्रांना किंवा नातेवाईकांना आपले दुःख व्यतीत करत असतो. परंतु त्यामुळे समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमची इज्जत जाते. आणि तुमची मजाक उडवली जाते.  त्यामुळे तुमचे दुःख स्वतः जवळ ठेवल्यास तुम्ही स्वतः त्याच्यावर उपाय काढू शकतात.

3) वैवाहिक जीवनातील गोष्टी लोकांना सांगू नका

वैवाहिक जीवनात पती-पत्नी एकमेकांना संपूर्ण गोष्टी शेअर करतात. परंतु आपल्या लाईफ पार्टनर बद्दलच्या कोणत्याच खाजगी गोष्टी लोकांना सांगू नका. त्याचबरोबर बऱ्याचदा पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर याबाबत बाहेरच्या व्यक्तींना म्हणजेच लोकांना सांगू नका. भांडण तेवढ्यापुरता तिथेच मिटवून टाका.  लोकांना या गोष्टी समजल्यानंतर ते तुमची चेष्टा उडवतील. यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो.

4) तुमचे रहस्य कोणाला सांगू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti) बरेच व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःचे रहस्य इतरांना सांगत असतात.  परंतु यामुळे तुम्हाला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्या मूर्ख व्यक्तींना तुमच्या मनातील किंवा तुमचे रहस्य सांगत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला यामुळे परेशानीचा सामना करावा लागू शकतो.

5) तुमची कमाई लोकांना सांगू नका

प्रत्येक व्यक्ती जीवनात पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो.  त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला समोरचा व्यक्ती किती पैसे कमवतो यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला न सांगितल्यास ते दुसऱ्या मार्गांनी अंदाज लावू शकतात.  तरीही आपण किती पैसे कमवतो हे शक्य तेवढे गोपनीय ठेवणे गरजेचे आहे.