Chanakya Niti : कोणालाही सांगू नका या गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान

Chanakya Niti । विष्णुपंत शिरोमणी आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लेखन केले आहे. या लिखाणाच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांचे आयुष्य जगताना  येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात केली. या अडचणींवर मात करत त्यांनी यशाचे शिखर गाठले. याबाबत त्यांनी त्यांच्या चाणक्यनीती मध्ये जीवनात यशस्वी होताना येणाऱ्या समस्यांवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणती ना कोणती घटना घडत असते. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना त्यांच्या जीवनात घडणाऱ्या काही गोष्टी, घटना, कुटुंबातील काही गोष्टी इतरांसोबत शेअर करण्याची  सवय असते. परंतु हे अत्यंत चुकीचे असून तुम्ही इतरांना तुमच्या पर्सनल गोष्टी सांगत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी.

   

१) कुटुंबातील व्यक्तींची कमतरता शेअर करू नका

बऱ्याच व्यक्तींना आपल्या कुटुंबांतील सर्व गोष्टी मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांसोबत शेअर करायला आवडतात.  परंतु त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर दुरावा आणि अविश्वासाची भावना निर्माण होते. घरातील गोष्टी घरातच राहिल्या तर तुमचे जीवन आनंदी होऊ शकते. चाणक्यनीती नुसार, (Chanakya Niti) आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या काही समस्या किंवा कमतरता असतील त्या कोणासमोरच सांगू नये. कारण यामुळे कुटुंबाची मानहानी होते. आणि तुमचे नातं देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील कोणत्याच गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना किंवा मित्रांना, नातेवाईकांना सांगू नका.

२) दुःख आणि संकट इतरांसोबत शेअर करू नका- Chanakya Niti

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या येत असतात. या समस्यांवर उपाय शोधणे किंवा समस्यांचे निराकरण करणे हे स्वतःने केले पाहिजे. इतरांना आपल्या समस्या सांगून समस्येचे निराकरण होत नाही. त्यामुळे कधीच इतरांना तुमच्या अडचणी समस्या सांगू नका. चाणक्यनीती नुसार, (Chanakya Niti) इतरांसमोर दुःख किंवा संकट लपवून ठेवल्यास  आणि सतत हसत राहिल्यास तुम्ही स्वतः तुमच्या अडचणींचा सामना करू शकतात. परंतु तुम्ही तुमचे दुःख आणि तुमच्यावर आलेले संकट इतरांना सांगत असाल तर तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आणि तुमच्या अडचणींचा फायदा लोक घेऊ शकतात.

३) वैवाहिक जीवनातील गोष्टी लोकांना सांगू नका

वैवाहिक जीवनात पती-पत्नी एकमेकांना संपूर्ण गोष्टी शेअर करतात. परंतु आपल्या लाईफ पार्टनर बद्दलच्या कोणत्याच खासगी गोष्टी लोकांना सांगू नका. त्याचबरोबर बऱ्याचदा पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर याबाबत बाहेरच्या व्यक्तींना म्हणजेच लोकांना सांगू नका. झालेले भांडण तिथेच मिटवून टाका.  लोकांना या गोष्टी समजल्यानंतर ते तुमची मजाक उडवतील. यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो. पती-पत्नी या दोघांच्या नात्यांमध्ये संवेदनशीलता, आदर आणि संवाद असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु पती-पत्नी या दोघांमधील संवाद किंवा दोघांमधील भांडण इतरांना सांगितल्यास नात्यांचा अपमान होऊ शकतो.