टाइम्स मराठी । विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला. या संकटांचा सामना करत असताना त्यांनी खचून न जाता यशाचे शिखर गाठले. चाणक्यांनी लिहिलेल्या चाणक्यनीतीतुन आजही अनेकांना मार्गदर्शन मिळते. आयुष्य कस जगावे? शत्रूंवर मात कशी करावी? यशस्वी होण्यासाठी काय करावं? याबाबत चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीतुन उपाय सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पती- पत्नीच्या नात्याबद्दल सुद्धा (Chanakya Niti For Husband Wife) लिखाण केलं आहे. पती- पत्नीचे नातं कस असावं? आयुष्यभर एकमेकांची सोबत राहण्यासाठी एकमेकांशी कस वर्तन करावं याबाबत चाणक्यांनी काही मार्गदर्शक सल्ले दिले आहेत. चाणक्याच्या मते, कोणत्याही मुलाने आपल्या होणाऱ्या बायकोपासून कधीही ३ गोष्टी लपवू नयेत, अन्यथा लग्नानंतर तुमच्यावर पाश्चात्त्ताप करण्याची वेळ येऊ शकते. या ३ गोष्टी कोणत्या तेच आज आपण पाहूयात …
1) वय
चाणक्यनीती नुसार, प्रत्येक मुलाने किंवा मुलीने लग्नापूर्वी आपल्या साथीदाराचे वय पाहावे… पती-पत्नीच्या वयातील फरक जितका कमी असेल तितके त्यांचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी असते. मात्र कधीं कधी आपलं वय जास्त सांगायला लाज वाटत असल्याने काहीजण खोटं वय सांगतात … मात्र चाणक्याच्या मते असं कधीही करू नका.. तुमचं खरं वय निसंकोचपणे आपल्या पार्टनरला सांगा नाहीतर लग्नानंतर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
2) आरोग्य– Chanakya Niti For Husband Wife
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, लग्नापूर्वी पती-पत्नीने जोडीदाराच्या आरोग्याची माहिती मिळवली पाहिजे. त्यांना शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या काही समस्या असल्यास त्याबद्दल त्यांना आधीच सांगायला. एखाद्या मुलाला जर कोणता आजार असेल तर त्याने लग्नापूर्वीच आपल्या पत्नीला याबाबत सांगायला हवं नाहीतर लग्नानंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
3) नाते
चाणक्यने आपल्या ‘नीती शास्त्रा’मध्ये म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या जोडीदारासोबत आपल्या भूतकाळातील प्रेमसंबंधांबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. जेणेकरून भविष्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही. भूतकाळात तुमचं कोणावर प्रेम असेल तर ती गोष्ट होणाऱ्या बायकोपासून लपवू नका .. यामुळे एकमेकांबद्दल विश्वास (Chanakya Niti For Husband Wife) बसून नातं आणखी घट्ट होईल.