Chanakya Niti For Marriage : मुलगी बघायला जाताय? त्यापूर्वी चाणक्यांचे ‘हे’ सल्ले ऐकाच

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Chanakya Niti For Marriage) यांच्या नुसार, ज्या घरात महिला नियमांचे पालन करून राहतात,त्या ठिकाणी दारिद्र्य कधीच येत नाही. लग्न करत असताना जिवनसाथीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जीवनसाथी अयोग्य निघाल्यास आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न करत असताना विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य बरबाद होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक मुलाने जीवनसाथी निवडताना मुलींमध्ये कोणत्या गोष्टी बघायला हव्यात याबाबत आचार्य चाणक्यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. चला जाणून घेऊयात . चाणक्यांच्यानुसार, खालील गन असलेल्या मुलीशी लग्न केल्यास तुम्हाला पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.

   

धर्म कर्म न मानणारी मुलगी – Chanakya Niti For Marriage

लग्नासाठी जीवनसाथी निवडणे हे अत्यंत कठीण आहे. जीवनसाथी खराब निघाल्यास संपूर्ण आयुष्य बर्बाद होते. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या एकनिष्ठ असलेल्या मुलींचाच लग्नासाठी विचार करावा. आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या मुलीचा धर्म कर्म यावर विश्वास नाही त्या मुली सोबत लग्न करणे अयोग्य आहे. ज्या मुलींना आपल्या धर्म आणि कर्म याचं ज्ञान प्राप्त नसते त्या मुली घराघरात फूट पाडतात. परंतु धार्मिक कार्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या मुली कुटुंबातील सर्व गोष्टी सांभाळून घेतात.

दुसऱ्यांच्या मर्जीने लग्न करणारी मुलगी

बऱ्याचदा लग्न करताना मुलींची इच्छा विचारात घेतली जात नाही. आज-काल प्रेम विवाह करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एखाद्या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम असेल परंतु आई-वडिलांचा विरोध असल्यामुळे अशा मुली प्रेशर मध्ये येऊन आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलासोबत लग्न करतात. अशा मुलीकडून घर आणि नाते सांभाळण्याची उमेद ठेवणं चुकीचं आहे. अशी मुलगी कधीच कोणाला सन्मान देऊ शकत नाही. परंतु यामुळे वैवाहिक जीवनामध्ये (Chanakya Niti For Marriage) अडचणी येऊ शकतात.

रागीट स्वभावाची मुलगी

आचार्य चाणक्य म्हणतात की , जी मुलगी चिडचिडी, रागीट स्वभावाची आहे या मुली सोबत लग्न केल्यास घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे अशी मुलगी निवडा की जी शांत स्वभावाची असेल. रागीट स्वभावाच्या मुलींचे बोलण्यावर नियंत्रण नसते. त्यांच्या या स्वभावामुळे पती- पत्नीमध्ये (Chanakya Niti For Marriage) तेढ निर्माण होऊ शकतो.