Chanakya Niti : ‘या’ वाईट सवयींमुळे लक्ष्मीमाता कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. मनुष्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं याबाबत आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीतून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आणि आर्थिक बाबतीत आपण सक्षम होण्यासाठी कोणत्या वाईट सवयी सोडायला हव्यात याबाबत सुद्धा आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे. चला याबात जाणून घेऊया.

   

१) संपत्तीची हाव –

आचार्य चाणक्य म्हणतात की, संपत्ती मिळवण्यासाठी लालची भावना तुम्हाला पैशापासून वंचित करू शकते. तुम्ही मेहनतीच्या बळावर पैसे कमवू शकतात. पण तुम्ही दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा टाकत असाल तर ते अयोग्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पुण्य करत नसाल तर तुमची परिस्थिती बिघडू शकते.

२) अस्वच्छ राहणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक स्वच्छ आणि निरोगी राहत नाही. ते सतत आजारी पडतात. त्याचबरोबर जे लोक स्वच्छ राहत नाही चांगले वस्त्र घालत नाही त्यांच्या आजूबाजूला अस्वच्छ वातावरण निर्माण होते. हे लोक प्रत्येक वेळेस दारिद्र्यात जीवन जगतात. अशा लोकांवर लक्ष्मीमाता कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे स्वच्छ राहणीमान असणे गरजेचे आहे.

३) कठोर बोलणे

जे लोक अधिक कठोरपणाने बोलतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कडू आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं कठोर बोलण्याची सवय लवकरच बदलली पाहिजे. कठोर बोलण्यामुळे समोरच्या व्यक्ती सोबतचे आपले संबंध खराब होऊ शकतात आणि लोक कंगाल पण होऊ शकतात.

४) सूर्यास्तानंतर झोपणे

सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही अत्यंत वाईट सवय आणि अशुभ असून यामुळे घरात दारिद्र्य येते. यामुळे घरात कधीही माता लक्ष्मी येत नाही आणि प्रसन्न होत नाही. त्यामुळे चाणक्याच्या मते कधीही सूर्यास्तानंतरच्या काळात झोपू नये