Chanakya Niti : अशा मुलींसोबत कधीच करू नका लग्न, अन्यथा होईल मोठं नुकसान

Chanakya Niti। आचार्य चाणक्य यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फॉलो करत असतात. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति, नीतिशास्त्र यासारख्या बऱ्याच विषयांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर चाणक्य नीति मध्ये जीवनात आपण करत असलेल्या चुका त्याच्यावर उपाय आणि काही चुका करण्यापासून रोखण्यासाठी चाणक्य नीति सावध करत असते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नुसार, ज्या घरात महिला नियमांचे पालन करून राहतात, त्या ठिकाणी दारिद्र्य कधीच येत नाही. लग्न करत असताना जीवनसाथी ची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जीवनसाथी अयोग्य निघाल्यास आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न करत असताना विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक मुलाने जीवनसाथी निवडताना मुलींमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायला हव्यात हेच आम्ही तुम्हाला आज सांगत आहोत.

   

१) संस्कार –

पहिली गोष्ट म्हणजे संस्कार, आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीचं लग्न हे संस्कारी मुली सोबत होते ती घराला स्वर्गप्रमाणे ठेवते. त्याचबरोबर अशी मुलगी संपूर्ण परिवाराची काळजी घेते. परंतु संस्कार नसलेल्या मुली सोबत कधीच लग्न करू नका. अशा मुली संसार उध्वस्त करतात. तुमचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून लग्न करण्यापूर्वी विचार करूनच निर्णय घ्या.

२) गुण – (Chanakya Niti)

दुसरी गोष्ट म्हणजे गुण…. आचार्य चाणक्य यांच्या मते बऱ्याचदा लग्न करण्यासाठी सुंदर मुलीची निवड केली जाते. परंतु तिच्या गुणांना बघितलं जात नाही. जो व्यक्ती मुलीची सुंदरता बघून लग्न करतो तो सर्वात मूर्ख व्यक्ती आहे. मुलींचा रंग रूप आणि सुंदरता हे सर्व काही नसून खऱ्या अर्थाने ती तिच्या गुणांनी सुंदर असते. त्यामुळे सुंदरता बघून लग्न करू नये. मनुष्याकडे चांगली विद्या, कला, गुण असतील तर ते स्वीकारणं चांगलं आहे. यानुसार चांगल्या गुणांनी संस्कार असलेल्या मुलीसोबत लग्न करणं चांगलं आहे.

३) धर्म-

आचार्य चाणक्यांच्या मते, (Chanakya Niti) ज्या स्त्रियांचा धर्म कर्म यावर विश्वास नाही त्या मुलींसोबत लग्न करणे अयोग्य आहे. ज्या मुलींना आपला धर्म आणि कर्म याचं ज्ञान प्राप्त नसते. त्या मुली घराघरात फूट पाडतात. त्यामुळे अशा व्यक्तीसोबत लग्न करणे चुकीचं आहे.

४) बोलण्याची पद्धत –

आचार्य चाणक्य म्हणतात की जी मुलगी चिडचिडी, रागीट स्वभावाची आहे या मुली सोबत लग्न केल्यास घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे अशी मुलगी निवडा की ती शांत स्वभावाची असेल. त्याचबरोबर ज्या स्त्रीची वाणी मधुर असते ती सर्वांचे मन जिंकून चांगल्या प्रकारे संसार करते.