बायको आणि पुतण्या नको त्या अवस्थेत सापडले; काकाने उचललं मोठं पाऊल

टाइम्स मराठी । आज-काल मोठ्या प्रमाणात अश्लीलता वाढताना दिसत आहे. एवढेच नाही तर गुन्हेगारी आणि गुन्हेगार प्रचंड मोकार झाले असल्यास देखील आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर नातेसंबंधांना काळीमा फासणाऱ्या घटना तसेच अनैतिक संबंधची प्रकरणे सुद्धा आज काल मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना आता उघड झाली आहे. काकी आणि पुतण्या रात्रीच्या अंधारामध्ये अश्लील चाळे करताना काकांना सापडले आहे. हा संपूर्ण प्रकार काकांनी स्वतःच्या डोळ्याने बघताच खळबळ उडाली. तीन वर्षापासून दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू असल्याचे उघड झालं आहे. यापूर्वी देखील ही घटना उघड झाली होती. परंतु पतीने विरोध करून देखील पत्नी हे संबंध तोडायला तयार नव्हती. त्यामुळे या संबंधित महिलेच्या पतीने महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवलं.

   

ही घटना बिहारच्या जमुईमधील लखापूर गावातील आहे. या गावात राहणाऱ्या इंद्रदेव पासवान असं या काकांचं नाव आहे. त्यांची पत्नी रुबी देवी आणि तिचा पुतण्या पंकज यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. या महिलेचा नवरा इंद्रदेव रोजगारासाठी बाहेरगावी काम करतो. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले हे प्रेम संबंध इंद्रदेव यांना समजल्यावर त्यांनी विरोध केला. परंतु रुबी देवी पंकजला सोडण्यासाठी तयार नव्हती. त्यावेळी इंद्रदेवने विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर इंद्रदेव यांनी ग्रामस्थांकडे तक्रार केली आणि पंचायत देखील बोलवली. यावर दोघांचं लग्न करून देण्याचा निर्णय पंचांनी दिला.

या निर्णयाला होकार देत इंद्रदेव ने रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या टॉर्च चा प्रकाशामध्ये दोघांचं लग्न लावून दिलं. त्यामुळे रुबी देवी खूप खुश होती. एवढ्यात ही घटना संपत नाही. तर याच्या उलट लग्न झाल्यानंतर पुतण्या म्हणजे पंकज ने वेगळाच आरोप संपूर्ण ग्रामस्थांवर लावला. ग्रामस्थांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं असल्याचं त्याचं म्हणणं आहे. पूर्ण गावामध्ये या घटनेची चर्चा सुरू असून पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली.

पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर देखील पोलीस रात्री गावात यायला तयार नव्हते. असं पंकज च्या आईने सांगितलं असून या प्रेम संबंधामुळे गावातील वातावरण बिघडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पंचांच्या मते रुबी देवीच्या नवऱ्याला म्हणजेच इंद्रदेव यांना त्यांच्या बायको सोबत राहायचं नव्हतं. परंतु इंद्रदेव यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे.