प्रियकरासाठी नवऱ्याला सोडून नेपाळमधून भारतात आली; सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली

टाइम्स मराठी । काही महिन्यांपासून सोशल मीडिया, फेसबुक इंस्टाग्राम, पबजी गेमिंग अँप च्या माध्यमातून प्रेम प्रकरण उघड होत आहेत. त्याचबरोबर या घटनांमधून काहीजण पाकिस्तान वरून भारतात तर काहीजण भारतातून पाकिस्तानात जाण्याची हिंमत करताना दिसत आहेत. प्रेम प्रकरणातून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदरचे प्रकरण तर तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर भारतातून अंजू, आणि एक चिनी तरुणी देखील पाकिस्तानात गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती. या घटना समोर असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेपाळ मधून एक महिला आपल्या प्रियकरासाठी पतीला सोडून भारतात आली. परंतु इथे आल्यावर तिला आपल्या प्रियकराबाबत जे सत्य समजलं ते पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. च;या जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

   

ही घटना नेपाळमध्ये राहत असलेल्या संगीता देवी आणि भारतातील गोविंद यांची आहे. संगीता देवी ने प्रेम प्रकरणातून पतीला घटस्फोट देत गोविंद सोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर गोविंदने तिच्यासोबत राहणे कमी केले. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. गोविंदा अचानक असं का वागतोय हा विचार संगीता करत असताना तिने त्याच्या घराचा पत्ता काढला आणि पत्त्यावर दिलेल्या घरी पोहोचली. त्या ठिकाणी गेल्यावर तिच्यासोबत धोका झाल्याचं तिला समजलं. कारण गोविंदाचे आधीच एक लग्न झाल्याचे तिला समजलं.

ही संपूर्ण घटना बिहार येथील दरभंगाच्या भाकरगंज परिसरातील आहे. गोविंद याची रक्सौल या ठिकाणी बदली झाली होती. त्यामुळे तो तिथे राहत होता. त्याच दरम्यान गोविंदची मैत्री सोशल मीडियावरून नेपाळमधील संगीता सोबत झाली. आणि मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. या काळात संगीताने ती विवाहित असून दोन मुलांची आई असल्याचे स्पष्टपणे गोविंदला सांगितलं होतं. यावर गोविंदाने तिला पहिल्या पतीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर असं सांगितलं. गोविंदच्या बोलण्यात येऊन संगीता फसली. आणि तिने पतीला घटस्फोट देऊन मुलांना सोडलं आणि गोविंद सोबत मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्नानंतर गोविंद आणि संगीता रक्सौल या ठिकाणी राहू लागले. त्यानंतर गोविंदाची बदली ही समस्तीपुर या ठिकाणी झाली. त्यानंतर गोविंदचे वागणे पूर्णपणे बदलले. आणि तो संगीता पासून लांब राहू लागला. त्यानंतर संगीताने गोविंदाच्या घराचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला.

गोविंद हा खासगी बँकेमध्ये काम करतो. त्याने आठ वर्षांपूर्वी दरभंगा या ठिकाणी असलेल्या प्रेरणा कुमारी सोबत प्रेमविवाह केला होता. या दरम्यान त्याची रक्सौल या ठिकाणी बदली झाली होती. गोविंद चे वागणे सहन न झाल्यामुळे संगीताने त्याच्या बँकेच्या शाखेतून गोविंदचा खरा पत्ता मिळवला आणि दरभंगा या ठिकाणी पोहोचली त्यावेळी तिला गोविंद चे लग्न झालेले असल्याचं समजले. गोविंद ची पहिली पत्नी प्रेरणाने लग्नाचे व्हिडिओज आणि फोटो दाखवत तिला मुलं देखील असल्याचं सांगितलं. यानंतर हे प्रकरण प्रचंड वाढले आणि गोविंदने संगीता आणि प्रेरणा दोघीना देखील घराच्या बाहेर काढलं. आणि स्वतः ही फरार झाला.