रक्षाबंधनानंतर ‘या’ 3 राशींना येणार अच्छे दिन; पहा तुमची रास आहे का?

टाइम्स मराठी। आज रक्षाबंधन आहे…. आजच्या पवित्र दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाव तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो… बहीण भावाच्या नात्याचा हा खास असा सण आहे. रक्षाबंधनानंतर बुध आपली रास बदलून म्हणजेच सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. 4 सप्टेंबर पर्यंत बुध कर्क राशीत असेल. राशिभविष्यानुसार, या काळात ३ राशींच्या लोकांचे नशीब चांगलंच फळफळणार आहे. त्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदचे दिवस येणार असून त्यांची आर्थिक प्रगती सुद्धा होणार आहे. या राशी नेमक्या आहेत तरी कोणत्या? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

   

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी 22 ऑगस्टपासूनच पुढचे जीवन अतिशय लाभदायी असणार आहे. बुधच्या प्रभावाने तुम्हाला नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्यामध्येही तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणानं नोकरी मिळेल. तसेच प्रेम प्रकरणात सुद्धा चांगला जोडीदार तुम्हाला याच काळात मिळू शकतो.

मिथुन रास (Gemini)

बुध संक्रमणाच्या प्रभावामुळे मिथुन राशींच्या लोकांची अर्थी भरभरात होईल, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही सोने खरेदी किंवा कपडे खरेदी करू शकता. लग्न न झालेल्या मुलांची लागणे ठरू शकतात. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात तुमचे सोन्याचे दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही ज्या ज्या गोष्टी कराल त्यात तुम्हाला यश पाहायला मिळेल.

तूळ रास (Libra)

बुधाचं संक्रमण तुळ राशींच्या व्यक्तींना नवी ऊर्जा देईल… 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही नोकरी करत असाल तर त्याठिकाणी तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे तसेच नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडू शकते. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची संधी तुम्हाला याच काळात प्राप्त होईल. एकूणच तूळ राशीसाठी अच्छे दिन पाहायला मिळतील.