हिंदू धर्मामध्ये काय वाईट होतं? प्रश्न विचारातच राखीने दिले ‘हे’ उत्तर

टाइम्स मराठी । बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली बॉलीवूड स्टार राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की ती सोशल मीडियापासून लांब राहील. सोशल मीडियावर तिचे मजेशीर फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या बॉयफ्रेंड पासून आणि लग्नामुळे चर्चेत होती. आता राखी सावंत ला वेगळ्याच कारणामुळे ट्रोल करण्यात येत आहे. राखी सावंत ने अगोदर लग्न केलं त्यानंतर तिचा नवरा तिला सोडून गेला. त्यानंतर तिने आदिल खान दुर्रानी सोबत लग्न केलं. आणि इस्लाम धर्म स्वीकारला होता. पती ने फसवल्याचा आरोप प्रत्यारोप केल्यानंतर राखी सावंत उमराह करण्यासाठी मक्का मदिना येथे गेली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

   

मका मदिना या ठिकाणावरून आता राखी सावंत मुंबईला परतली आहे. मुंबईला परतल्यावर मला राखी नाही तर फातिमा म्हणा असं वक्तव्य तिने केलं. तिच्या या वक्तव्यावर मीडियाने तिला हिंदू धर्माबाबत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून ती देखील थोडा वेळ हबकली आणि विचार करून नंतर तिने यावर उत्तर दिले. मीडियाने तिला विचारलेला प्रश्न असा होता की, हिंदू धर्मामध्ये काय वाईट होतं की तू इस्लाम धर्म स्वीकारला? त्यावर राखी विचारात पडली. आणि थोडा वेळ विचार केल्यानंतर राखीने उत्तर दिलं की, ” हिंदू धर्मामध्ये काहीच चुकीचं नव्हतं आणि वाईटही नव्हतं, मी मुस्लिम मुलाशी लग्न केलेलं आहे. निकाह केला होता त्यामुळे जेव्हा तुम्ही निकाह करतात तेव्हा तुम्हाला इस्लाम कबूल करावा लागतो. मी मागच्या वर्षापासून विवाहित आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की मला मक्का मदीना या ठिकाणी जायला मिळालं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी राखी सावंत ला प्रचंड ट्रोल केले. यावर एका नेटकऱ्यांनी लिहिलं की, ती कधीच हिंदू नव्हती, ती ख्रिश्चन होती. यावर आणखीन एका युजरने कमेंट केली की, तिचे लग्न झाल्यावर ती मुस्लिम झाली, आता घटस्फोट झाल्यावर ती ख्रिश्चन होईल.

दरम्यान, राखी सावंत ने फेब्रुवारी महिन्यात आदिल खानवर मारहाणीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार तो सहा महिने तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर आदिलखाने पत्रकार परिषद घेऊन राखी वर बरेच आरोप लावले होते. राखी सावंत आणि आदिलचा घटस्फोट होणार असून सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.